Breaking News
25 कोटी 85 लाख रुपयांची दंड आकारणी
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 63 हजार गुन्हे,तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखलतर 25 कोटी 85 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात 2 मार्च ते 20 सप्टेंबरपर्यंत कलम 188 नुसार 2,63,481 गुन्हे नोंद झाले असून 35,880 व्यक्तींना अटक करण्यात आली.96,174 वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यांसाठी 25 कोटी 85लाख 94 हजार 064 रु. दंड आकारण्यात आला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 359 घटना घडल्या. त्यात 894 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
100 नंबर- 1 लाख 13 हजार फोन
पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1,13,116 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.या काळात अवैध वाहतूक करणार्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर 96,174वाहने जप्त करण्यात आली.
पोलिस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील 199 पोलीस व 23 अधिकारी अशा एकूण 222 पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai