Breaking News
मुंबई : राज्यात आज कोरोनाचे 21,029 रुग्ण वाढले आहेत. गेल्या 24 तासात 19,476 रुग्ण बरे घरी गेले. तर 479 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 12 लाख 63 हजार 799 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 9 लाख 56 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही राज्यात 2 लाख 73 हजार 477 रुग्ण उपचार घेत आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. रिकव्हरी रेट वाढला असून तो 75.65वर गेला आहे. तर मृत्यूदर 2.68 टक्के इतका आहे. आतापर्यंत राज्यात 61,06,787 जणांची कोरोना टेस्ट झाली असून 12,65,799 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या राज्यात 18,75,424 जण होम क्वारंटाईन असून 34,457 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai