Breaking News
आमदार मंदा म्हात्रे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
नवी मुंबई : राज्य शासनाने 1 ऑक्टोबरपासून मुंबईमध्ये येणार्या वाहनांना 5 ते 25 रुपये पर्यंतची टोल दरवाढ केलेली आहे. नवी मुंबई ही मुंबईला लागूनच असल्याने व नवी मुंबईतील वाहने दररोजच मुंबईला ये-जा करीत असल्याने सदर टोल दरवाढ नवी मुंबईतील वाहनांना लागू करू नये असे निवेदन बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात अनेक नागरिकांच्या नोकर्या गेल्याने व संपूर्ण व्यवसाय ठप्प झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना नवी मुंबईतील वाहनांना सदर टोलची केलेली दरवाढ अयोग्य असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. नवी मुंबईतील वाशी व ऐरोली टोल नाक्यावर नवी मुंबईतील वाहनांना खर्या अर्थाने टोल माफीची आवश्यकता असताना राज्य शासनाने केलेल्या टोल दरवाढीने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सदर टोल दरवाढ रद्द न केल्यास नवी मुंबईतील नागरिकांसहित आंदोलन करण्याचा इशारा आमदार म्हात्रे यांनी दिला असून मुख्यमंत्री नक्कीच नवी मुंबईतील जनतेला न्याय देतील असेही त्यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai