Breaking News
आ. गणेश नाईक यांचा इशारा
नवी मुंबई ः शहरात एमआयडीसी भागातून निर्माण होणार्या प्रदुषणाचा त्रास वाढला आहे. याविषयी पालिका आयुक्तांनी एमपीसीबी मंडळाला पत्र दिले आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप हालचाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे जर प्रदुषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) प्रदुषण थांबवण्यासाठी कठोर पावले उचलली नाही तर या मंडळांवर मोर्चा काढू, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे.
कोरोना प्रतिबंधक उपायांवर चर्चा करण्यासाठी आ.नाईक यांची आढावा बैठक सोमवारी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या समवेत पार पडली. नाईक यांच्या माध्यमातून माजी नगरसेविका शुभांगी पाटील, माजी नगरसेविका उषा भोईर यांनी हा विषय मांडला. तुर्भे, कोपरी, सानपाडा, घणसोली, पावणे इत्यादी परिसरात सकाळी आणि रात्रीच्या वेळेस वायुप्रदुषण वाढते. वातावरणात दुर्गंधी भरलेली असते, ही बाब नाईक यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे नागरिकांना श्वसनाचे व त्वचेचे विकार उदभवत आहेत. आयुक्तांबरोबरच्या मागील दोन बैठकांमधून देखील हा विषय मांडण्यात आला होता. आयुक्त बांगर यांनी एमपीसीबी मंडळाला पत्र दिल्याचे सांगितले. मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रदुषणाचे कारण शोधण्यासाठी काहीच हालचाल करण्यात आलेली नाही. या उदासिन वृत्तीबददल या मंडळाने जर आवश्यक कारवाई केली नाही तर मात्र त्यावर मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai