Breaking News
हा उन्नत मार्ग सप्टेंबर 2021 पर्यंत होणार खुला ; प्रवास फक्त 10 मिनिटे
नवी मुंबई : नवी मुंबई मार्गे कल्याण डोंबिवलीला जाणार्या वाहनचालकांचा ट्रॅफिकमध्ये अडकून प्रचंड वेळ वाया जातो. यावर उपाय म्हणून थेट ऐरोलीपासून मुंब्रापर्यंत बोगदा तयार करुन नवीन रस्ता बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर काटई ते ऐरोली हा प्रवास फक्त 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. बोगद्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सप्टेंबर 2021 पर्यंत पुर्ण होणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
लॉकडाउनमध्ये अतिशय मंद गतीने सुरू असलेल्या कामाचा आढावा गुरुवारी खासदार डॉ. शशिकांत शिंदे यांनी घेतला. याच कामातील दुसरा टप्प्यातील एलिव्हेटेड मार्गाचे काम देखील युद्धपातळीवर सुरू असल्याचे शिंदे म्हणाले.
ऐरोली ते मुंब्रा वाय जंक्शन आणि मुंब्रा वाय जंक्शन ते कटाई अशा दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी 1.8 किलोमीटरचा बोगदा बनवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील रस्ता हा ऐरोलीच्या खाडी पुलाजवळ सुरू होईल तो थेट मुंब्र्यातील वाय जंक्शनपर्यंत असेल. दुसर्या टप्प्यात याच रस्त्याला जोडून एलिव्हेटेड मार्ग तयार करण्यात येईल जो थेट कटरिना नाका इथे उतरेल. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार असून याचा सर्वाधिक फायदा कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ-बदलापूर येथील रहिवाशांना होणार आहे. कारण, या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर काटई ते ऐरोली हा प्रवास फक्त 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. हा रस्ता 12 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा असून त्यातील बोगदा 1.8 किलोमीटर इतका आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा रस्त्याचा बोगदा असल्याचे सांगितले जात आहे.
येणार्या काळात ठाणे नवी मुंबई आणि मुख्यतः मुंबईला जोडण्यासाठी हा रस्ता अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. या पाहणी दौर्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी उन्नत मार्ग 1 (फेज-1) - टनेल टप्पा 1 (टनेल फेज 1) या दोन कामांची पाहणी करत नियोजित वेळेच्या आधीच ऐरोली-काटई उन्नत मार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवा असे निर्देश श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित एम.एम.आर.डी.ए. च्या अधिकार्यांना दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai