Breaking News
नवी मुंबई ः एपीएमसीमधील पाचही बाजारपेठा आज बंद आहेत. माथाडी कामगारांच्या अनेक मागण्या पूर्ण न झाल्याने माथाडी कामगारांना एक दिवस बंद पुकारला आहे. तसेच वाशी रेल्वस्थानकात माथाडी कामगारांनी वाशी रेल्वे स्टेशन प्रबंधक पी.एन.सिंग यांना पुन्हा एकदा माथाडी कामगारांना रेल्वेने प्रवास करण्यास मुभा द्यावी या संदर्भात निवेदेन दिले.
शासनाकडे गेली 15 वर्ष अनेक प्रश्न प्रंलबित आहेत. तसेच सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होऊ लागला आहे. वर्क ऑर्डर नावाखाली माथाडी कामगारांवर गुंडगिरी करणार्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात यावी, पुनर्रचित सल्लागार समितीवर अनुभवी कामगार नेत्यांची सदस्य म्हणून निवड करावी, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे, कळंबोली स्टील मार्केटमध्ये विविध सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेतील त्रुटी दुर करणे यासारख्या अनेक मागण्या अनेक वर्ष प्रलंबित आहेत. वारंवार निवेदन देऊन व आंदोलने करुनही शासन या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे माथाडी कामगारांनी आज बंद पुकारला आहे. एपीएमसी बाजार पेठ येथे पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. पोलिस कर्मचार्यांनी भाजी मार्केट ते फळ बाजाराकडे जाणारा रस्ता बंद केले आहे. जो पर्यंत शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवले जाण्याचा इशारा आंदोलनकांनी दिला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai