Breaking News
नितीन गडकरींची घोषणा
मुंबई ः मुंबईच्या सीमेपर्यंत येणारा हाय-वे आता जेएनपीटीपर्यंत नेणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली. दिल्ली-मुंबई महामार्गाचे काम 45 टक्के पूर्ण झाले आहे. हा महामार्ग जेएनपीटीपर्यंत घेऊन जाणार असून यासाठी महाराष्ट्र सरकारची मदत घेण्यात येणार असल्याचीही माहिती गडकरी यांनी दिली. गडकरी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे हेसुद्धा उपस्थित होते.
मुंबईच्या सीमेपर्यंत येणारा हाय-वे आता जेईनपीटीपर्यंत नेणार असल्याची घोषणा गडकरींनी पत्रकार परिषद घेत केली. जेएनपीटी महामार्गसाठी लागणार्या स्टील आणि सिमेंटचा जीएसटी खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचेही यावेळी गडकरी यांनी सांगितले. मुंबई-दिल्ली हाय-वेच्या महाराष्ट्रातील पॅकेजसच्या जमीन अधिग्रहणाचे काम सुरु आहे. तसेच नागपूर-हैदराबाद एक्स्प्रेस-वे बांधणार आहे. मुंबई-गोवा हाय-वे प्रोजेक्टबद्दल स्टेट बँक अधिकार्यांशी चर्चा झाली आहे.
एका वर्षाच्या आत मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येईल, असेही गडकरी म्हणाले. उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाणारे ट्रॅफिक मुंबई-पुणे-हैदराबाद येथून जात होते. आता आम्ही सुरत-नाशिक-सोलापूर असा नवीन ग्रीन हाय-वे उभारणार आहोत. या ग्रीन हाय-वेमुळे मुंबई आणि पुण्याची वाहतूक कमी होणार असल्याचे गडकरी म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai