Breaking News
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
मुंबई : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारतर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. संचारबंदी असतानाही नागरिक रस्त्यांवर उतरत आहेत. त्यामुळे सरकारने घातलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणार्या व रस्त्यावर गर्दी करणार्यांची आता गय केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. रस्त्यांवर अकारण दिसणार्या आणि प्रवास करणार्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील. तसेच गरज पडल्यास राज्यात संचारबंदीही लागू केली जाईल.
ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करणार्यांमुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गर्दी करणार्या मोजक्या ‘निर्बुद्धां’मुळे राज्यातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. राज्य शासनाने आतापर्यंत संयमाने घेतले, परंतु हा संयम कायम ठेवणे यापुढे शक्य नाही. बंदी आदेशांचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करणारच, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. ‘कोरोना’ची साथ पसरु नये यासाठी शासन आवश्यक सर्व पावले उचलेल, परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण राज्यात संचारबंदीचा निर्णय घेतला जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तसेच विलगीकरण केलेल्या संशयितांनी निर्बंध मोडून लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करु नये. तसे केल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करुन कारवाई करु, असेही त्यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai