Breaking News
शिक्षण विभागाच्या शाळांना सूचना
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशभरात 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. मात्र आता दुसरीकडे एप्रिल महिना सुरू होत असल्याने अनेक शाळांची शैक्षणिक वर्षही संपली आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांकडून विशेषतः नावाजलेल्या मोठ्या खाजगी शाळा आणि केंद्रीय मंडळाच्या शाळांकडून पालकांकडे मुलांची फी भरण्यासाठी तगादा लावला जातो. लॉकडाऊन आधीच अनेकांचे आर्थिक गणित बिघडले असल्याने शुल्क भरण्यासाठी मुदत मिळावी, अशी अपेक्षा अनेक पालकांकडून व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीमध्ये पालकांना सक्ती करण्यात येऊ नये असे परिपत्रक शिक्षण विभागाकडून काढण्यात आले आहे.
संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू असल्याने अनेक पालकांचे, ज्यांची रोजची कमाई आहे किंवा ज्यांचे तळ हातावर पोट असलेल्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. अशा परिस्थितीत शाळांनी पालकांकडे शाळेची फी भरण्यासाठी तगादा लावणे योग्य नाही, अशी सूचना शिक्षण विभागाने आहे. केंद्रीय मंडळाच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची वेळ झाली असल्याने शहरातील शाळांतून पालकांना ईमेल आणि मेसेजेसच्या माध्यमातून पुढील शैक्षणिक वर्षाची फी भरण्यासाठी संदेश धाडण्यात आले आहेत. मात्र यामुळे पालकांपुढे अडचण निर्माण झाली असल्याच्या तक्रारी शिक्षण अधिकारी कार्यालयांना प्राप्त झाल्या होत्या.
त्या अनुषंगाने राज्यातील सर्व मंडळाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना चालू वर्षाची आणि आगामी शैक्षणिक वर्षाची फी गोळा करताना सहानुभूती दाखविणे आवश्यक असल्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार लॉकडाऊन संपल्यानंतर फी गोळा करण्याची कार्यवाही शाळांनी करावी, आत्ता पालकांना सक्ती करण्यात येऊ नये अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai