Breaking News
नवी दिल्ली : गेल्या 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 1409 ने वाढ झाली आहे, तर 388 कोरोनाचे रुग्ण बरेही झाले आहेत. तर जवळपास 19 टक्के कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज नियमित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 21 हजार 393 जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. तर 681 लोकांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात 16 हजार 454 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 4257 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 78 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. तर गेल्या 28 दिवसात तब्बल 12 जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, मागील आठवड्यात हा आकडा 4 होता .
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai