Breaking News
नवी मुंबई ः केंद्रीय जल बांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी महाराष्ट्रातील अंतर्गत जलवाहतूक विकासकामांच्या प्रगतीबाबत ऑनलाईन बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी पुढील पावसाळ्यापूर्वी म्हणजे जून 2021 पूर्वी सर्व सुविधांसह फेरीबोट सुरू होईल असं आश्वासन राजन विचारे यांना दिले आहे.
जल वाहतूक प्रकल्प जून 2021 ला होणार सुरूप्रवासाचा ताण पाहता जलवाहतूक एक प्रभावी पर्याय म्हणून आणि महापालिकेस 32 किमी लांबीचा खाडीकिनारा उपलब्ध असल्याने त्याच्या अंतर्गत जलवाहतुकीसाठी वापर करता येईल, असा अहवाल ठाणे महानगरपालिकेने 2016 साली केंद्राकडे सादर केला होता. यामध्ये वसई-ठाणे- कल्याण हा 54 किमी लांबीचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित असून यामध्ये 10 ठिकाणी जेट्टी बांधून सुविधा पुरविण्याचा प्रस्ताव आहे. तसेच दुसर्या टप्प्यात ठाणे-मुंबई, ठाणे-नवी मुंबई या दोन्ही जलवाहतूक मार्गाचे देखील नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे-मुंबई 10 ठिकाणी, ठाणे-नवी मुंबई 8 ठिकाणी जेट्टींचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील जल मार्ग विकास प्रकल्पांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने निधी उपलब्ध होणार असून केंद्र शासनामार्फत महाराष्ट्रासाठी केंद्रीय निधी राखून ठेवला आहे असे सांगितले यातून वरील जलमार्गातील जेट्टीचे काम होणार आहे व संचलनाचे काम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये ऑपरेटरची नियुक्ती करून राज्य शासनामार्फत करण्याचे नियोजन केले आहे. तसेच महाराष्ट्रातील या जलमार्गावर पुढील पावसाळ्यापूर्वी म्हणजेच जून 2021 पूर्वी सर्व सुविधांसह फेरीबोट सुरू होणार असे माननीय केंद्रीय जल बांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीयानी खासदार राजन विचारे यांना आश्वासन दिले आहे.
नवी मुंबई येथील नेरूळ जवळ जेट्टी बांधकाम सुरू असून मांडवा ते मुंबई या धर्तीवर मांडवा ते नेरूळ फेरी सुरू करणे बाबत केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा अशी सूचना खासदार राजन विचारे यांनी केली. याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी सदर काम लवकरात लवकर मार्गी लावून संबंधित जेट्टी वरून लवकरच बोट सुरु होणार असे सांगितले.
पहिला टप्पा - वसई - ठाणे - कल्याण (50 किमी) जलमार्ग क्र. 53 या मार्गावर पुढीलप्रमाणे 10 जेटी असणार आहेत.
1. वसई
2. मीरा भाईंदर
3. घोडबंदर
4. नागला बंदर
5. कोलशेत
6. काल्हेर
7. पारसिक बंदर
8. नाजूर दिवा
9. डोंबिवली
10. कल्याण
दुसरा टप्पा - ठाणे ते मुंबई व नवीमुंबई (93 किमी) या मार्गावर पुढीलप्रमाणे 18 जेटी असणार आहेत.
1. साकेत
2. कळवा
3. विटावा
4. मीठ बंदर
5. ऐरोली
6. वाशी
7. ट्रोम्बे
8. एलिफंटा
9. फेरीघाट
10. गेटवे ऑफ इंडिया
11. वाशी
12. नेरूळ
13. बेलापूर
14. तळोजा
15. जुईगाव
16. पनवेल
17. जे. एन. पी. टी.
18. मोरा
अशाप्रकारे जेटी असणार असून या जलवाहतुकीमुळे शहरातील प्रदूषण कमी होऊन सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरिकांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai