Breaking News
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. परतीच्या पावसामुळे शेतकर्याचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही परतीचा पाऊस परतलेला नाही, तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी 21 ऑक्टोबरपर्यंत रिपरिप सुरू असणार आहे.
अरबी समुद्र, बंगालच्या खाडीतील हवामानात सतत बदल होत आहेत. याचा परिणाम म्हणून पाऊस आणखी काही दिवस बरसण्याची चिन्ह आहेत. त्यानुसार राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात, कोकण, गोवा, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा येथे हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशात परतीचा पाऊस हजेरी लावू शकतो.
सर्वसाधारणपणे 5 ऑक्टोबरपूर्वी राज्याच्या पूर्वेकडून परतीच्या पावसाची सुरुवात होते. त्यानंतर 10 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील बहुतांश भाग, मध्य प्रदेशातील पुर्वेकडील भाग, छत्तीसगडमधील उत्तरेकडील भाग असा परतीच्या पावसाचा प्रवास असतो. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि महाराष्ट्रात परतीच्या पाऊस 1 आठवड्यांनी लांबण्याची शक्यता आहे. असे असले तरी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai