Breaking News
आयआयटी मुंबईच्या अहवालातून स्पष्ट
मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये 12 ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित झाला होता. यासंदर्भातील अहवाल समोर आला असून तांत्रिक बाबींमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे त्यातून स्पष्ट करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईचे विद्यतु अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्रा. बी. जी. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात कोणताही घातपात किंवा सायबर हल्ल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मात्र वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. महापारेषणच्या कळवा पडघा ॠखड केंद्रात सर्किट 1ची देखभाल-दुरुस्ती सुरु असताना सर्व भार सर्किट 2वर होता. मात्र सर्किट 2मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे मुंबईतील वीज पुरवठा 12 ऑक्टोबर रोजी खंडित झाला होता. बाहेरून येणारा वीज पुरवठा खंडित झाल्यावर मुंबईला पुरवण्यात येणारा अतिरिक्त वीज पुरवठ्याची आयलँडिंग सुविधा नीट ठेवणे आवश्यक होते. मात्र ती नीट नव्हती. अशी परिस्थिती उदभवणे हेच अनपेक्षित होते. त्यामुळे अशा परिस्थिती जी जलद प्रक्रिया व्हायला हवी होती, ती झाली नसल्याचेही अहवालात म्हटले आहे. अचानक उदभवलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला यंत्रणा कमी पडल्याचेही या चौकशी समितीचे म्हणणे आहे.
मुंबईतील वीज पुरवठा खंडित प्रकरणी तीन समित्या स्थापन झाल्या असून त्यातील एका समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात नमूद करण्यात आलं आहे की, व्यवस्थेकडून त्वरित अॅक्शन व्हायला उशीर झाला असल्यामुळे एकाच वेळी संपूर्ण मुंबई आणि उपनगरांतील लाईट गेली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai