Breaking News
मुंबई : 31 डिसेंबर यंदा घरातच साजरा करा अशी सूचना राज्याच्या गृहविभागाने दिली आहे. गृह विभागाने सोमवारी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना संबंधित यंत्रणांना पाठविल्या आहेत. नव्या वर्षाचं स्वागत नागरिकांनी घरी थांबूनच अत्यंत साधेपणाने करावं असे आवाहन गृह विभागाने केले आहे.
राज्यात 5 जानेवारीपर्यंत रात्री संचारबंदी लागू आहे. त्यामुळे गेटवे, मरिन ड्राइव्ह आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अशी सूचनाही करण्यात आली आहे. कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक मिरवणुका 31 डिसेंबरला काढता येणार नाहीत. भारतात ही विविध राज्यांमध्ये काही निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये वर्षाच्या अखेरीस लोकांनी गर्दी करु नये म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai