Breaking News
मुंबई : सध्या वाढत जाणार्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबईत पाच सायबर पोलीस स्टेशन उभारण्यात आले आहेत. या नवीन सायबर पोलीस स्टेशनमध्ये दोन लाखांपासून ते 50 लाखांपर्यंतच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या पोलीस ठाण्यांमध्ये 50 टक्के मनुष्यबळ हे महिलांचे असणार आहे. सायबर कायद्याचे ज्ञान, गुन्हे उघडकीस आणण्यात असलेला अनुभव आणि सायबरचे प्रशिक्षण घेतलेल्या पोलिसांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सर्व पोलिस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सायबर गुन्ह्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. सायबर गुन्ह्यांच्या तपासकरता, तांत्रिक मदतीसाठी पोलिसांना तसेच तक्रारदारांना गुन्हे शाखेच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या सायबर पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे नवीन सायबर पोलीस स्टेशन सुरु करण्यात आली आहेत. स्थानिक पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या देखरेखीखाली पोलीस ठाण्याचे काम चालणार आहे. सायबर विभागात कामाचा अनुभव असलेले आणि सध्या प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त बाळसिंग रजपूत यांची तांत्रिक कामकाजासाठी मदत घेण्यात येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai