Breaking News
पालिका निवडणुक पुढे ढकलण्याची शक्यता
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेची मुदत एप्रिल 2020 मध्ये संपुष्टात आली. या काळात कोरोना संक्रममामुळे पालिका निवडणुक पुढे ढकलण्यात आली. आता एप्रिल 2021 मध्ये निवडणुक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र निवडणुकीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ दिल्याने निवडणुक पुढे ढकलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विविध कार्यक्रमापोटी प्रत्येक उमेदवारांनी लाखो रूपये खर्च केले आहेत. त्यांना कार्यक्रमापोटी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी मागील वर्षभरापासून कामाला लागलेल्या ईच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक 2020 मधील एप्रिल महिन्यात होणार होती. यासाठीची पूर्ण तयारी महानगर पालिका प्रशासनाने करून 111 प्रभागाची आरक्षण सोडतही काढली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पालिका निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. 2020 वर्ष कोरोनात गेले असून आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने येत्या एप्रिल महिन्यात निवडणूक लागणार असल्याचे बोलले जात होते. मतदार यादींचा कार्यक्रमानुसार 16 फेब्रुवारीला प्रारुप मतदान याद्या प्रसिद्ध झाल्या. यावर 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागवून 3 मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र तोच पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. पालिका प्रशासनाला पुन्हा एकदा आरोग्य सेवेवर लक्ष केद्रित करावे लागत आहे.त्यात मतदार यांद्यावरील हरकती व सूचनांवर काळजीपुर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी 3 मार्चची मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख निश्चित नसल्याने निवडणुका पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीसाठी ईच्छुक उमेदवारांनी वर्षभरापासून विविध कार्यक्रमापोटी पैस टाकून आर्थिक नुकसान सहन केले आहे. त्यात पुन्हा एकदा निवडणुका पुढे गेल्या तर त्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याने उमेदवारांची घालमेल वाढली आहे. वर्षांपासून निवडणूकीत जिंकण्यासाठी विविध कार्यक्रमापोटी प्रत्येक उमेदवारांनी लाखो रूपये खर्च केले आहेत. 2020 मधील एप्रिल महिन्यात होणार्या निवडणूकीसाठी सहा महिने आधीपासून उमेदवारांनी कार्यक्रमाचा धडाका लावला होता. यामध्ये महिलांचे हळदीकुंकू, खेळ महोत्सव, पतंग महोत्सव, देवदर्शन सहली, निवडणूक जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात आदींचा समावेश आहे. दुसरीकडे निवडणूक जिंकण्यासाठी प्रभागात आपला करिश्मा चालतोय का? मतदारांना कोणते प्रश्न भेडसावत आहेत? आदींची घरनिहाय माहिती घेण्यासाठी खाजगी सर्वे करणार्या संस्थांचा गेल्या दोन वर्षांपासून उरावर बसलेला खर्च, लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची गरज पडल्याने प्रभागातील नागरिकांना अन्नधान्य वाटणे, भाजीपाला पोचवणे, कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरोघरी मास्क, सॅनिटायझर वाटणे, सोसायट्यांच्या गेटवर सॅनिटायझर स्टँड देणे आदींचा भूर्दंड इच्छूक उमेदवारांच्या गळ्यात पडला होता. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक लढण्याआधीच राजकीय कार्यकर्त्यांचे 10 लाखांपासून ते 50 लाखांपर्यंत खर्च झाला आहे. मनपा निवडणुकीच्या अनुशंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे. कोरोना नियम पाळून नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी सर्व पक्षातील उमेदवारांनी केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai