Breaking News
मुख्यमंत्र्यांचा सुचक इशारा ; राजकीय पक्षाला विनंती आहे, लोकांची जीव जाईल असं वागू नका
मुंबई ः राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुर्ण लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
घाबरवण्यासाठी आलेलो नाही, मार्ग काढण्यासाठी आलो आहे, घाबरू नका असा धीर देत मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवादाची सुरुवात केली. राज्यातील परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी मी संवाद साधत आहे. कोरोनाचा शिरकाव होऊन आता वर्ष पूर्ण झालं आहे. मधल्या काळात या विषाणूला रोखण्यास आपण यशस्वी झालो होतो. कोरोनामुळे जगाची आर्थिक परिस्थिती दोलायमान झाली आहे. लॉकडाऊन करण्याची शक्यता पूर्णपणे टळलेली नाही. राज्यात रुग्ण वाढ झपाट्यानं होतं असून एकट्या मुंबईत दररोज 8 हजारांहून अधिक रुग्ण वाढत आहे. आज राज्यात 46 हजारपर्यंत संख्या वाढत चाललेली आहे. बेड्स, व्हेटिंलेटर, ऑक्सिजन बेड्स जरी वाढवत असलो तरी लागणारे डॉक्टर, तज्ज्ञ, नर्सेस कसे वाढणार? हा प्रश्न टिकाकारांना विचारला. आज राज्यात दोन वरुन पाचशे चाचण्यांची सेंटर उभारुन 50 हजार चाचण्या दर दिवशी होत आहेत. महाराष्ट्रात 75 हजार चाचण्या करण्याची क्षमता 1 लाख 82 हजार एवढी झाली आहे. पण त्याहीपेक्षा अडीच लाख क्षमता करायची आहे. आतापर्यंत 50 लाख नागरिकांचे लसीकरण पुर्ण झाले आहे. केंद्राने सहकार्य केल्यास दिवसाला तीन लाख लसीकरणाचे लक्ष राज्याने ठेवले आहे. नागरिकांच्या हितासाठी मला कठोर निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी मला विलन जरी ठरवलं तरी चालेल. कारण आपले कुंटुंब ही माझी जबाबदारी असल्याने त्यासाठी मी कोणतीही टिका सहन करण्यास तयार आहे असे ठाकरे यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai