Breaking News
वार्यासह जोरदार पावसाची शक्यता
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण होणार्या तॉक्ते चक्रीवादळाचा तडाखा राज्याच्या किनारपट्टीलादेखील बसणार आहे. मुंबई, ठाणे पालघर भागांत यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. मोठा तडाखा बसेल असा अंदाज नसला तरी मुंबई मनपाने मात्र काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. गुजरातला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
कोरोना महामारीच्या संकटामध्ये आता किनारपट्टीच्या भागांमध्ये तॉक्ते चक्रीवादळाचा धोकाही निर्माण झाला आहे. या चक्रीवादळामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराची किनार्याला धडकण्याची शक्यता आहे. पण तसं असलं तरी गुजरातला याचा मोठा फटका बसू शकतो.
महाराष्ट्राचा विचार करता राज्याच्या किनारपट्टी असलेल्या भागाला याचा मोठा फटका बसू शकतो. यात प्रामुख्याने मुंबई, ठाणे पालघर भागांत वादळी वार्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत फार मोठे नुकसान होण्याची शक्यता नाही, मात्र तरीही मुंबईतील कोविड सेन्टरच्या जवळपास असणार्या अनेक झाडांची छाटणी पालिकेने सुरू केली आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजन टँकवर झाडं पडू नयेत याची काळजी घेतली जात आहे. 14 ते 16 मे दरम्यान मुंबई आणि राज्याच्या किनारपट्टीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai