Breaking News
नवी मुंबईच्या आप कार्यकर्त्यांची मागणी
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत ऑटोरिक्षा चालकांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र ही घोषणा करुन एक महिना झाला तरी काहीही हाती आलेले नाही. त्यामुळे केजरीवाल सरकारप्रमाणे महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना आर्थिक मदत करा, अशी मागणी नवी मुंबईतील आप कार्यकर्त्यांनी केली आहे.
नवी मुंबईतील आपच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या रिक्षा स्टँडवर भेट दिली. यावेळी त्यांनी रिक्षाचालकांच्या काही मागण्या समजून घेतल्या. राज्यात लॉकडाऊन असल्याने दिवसाला 300 रुपये पण निघत नाही. त्यात महाग गॅस, सॅनिटायझर, घर भाडे, कर्ज या सर्व गोष्टी असताना घर कसे चालवायचे. रस्त्यावर माणसे नाहीत, धंदा ठप्प झालाय, त्यात 1500 रुपयांची तुटपुंजी मदत तरी लवकर् दया, अशी मागणी तुर्भे रिक्षा युनियनचे पदाधिकारी मोहोम्मद रईस यांच्या कडून करण्यात आली. तसेच ही 1500 रुपयांची मदत मिळण्यास पाठपुरावा कुठे करायचा, या बद्दलची माहिती शासनाने जाहीर करावी. एखाद्या रिक्षाच्या लोनचा हप्ता साधारण सहा हजार रुपये असतो. त्यासाठी सरकारने कर्ज देण्यार्या कंपन्यांना सांगून दिलासा देण्याची गरज आहे, अशी मागणी नेरुळ रिक्षा युनियनचे पदाधिकारी अनिल राठोड यांनी केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai