Breaking News
मुंबई : मुंबई आणि उपनगरात बुधवार सकाळपासून पाऊस सुरु झाला आहे. चक्रीवादळानंतर मुंबई शहरात आज वार्याचा वेग मंदावला आहे. पण पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. चक्रीवादळ आल्यानंतर झालेल्या पावसामुळे मुंबईच्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, यातच सलग तिसर्या दिवशी हा गारवा कायम आहे. पण मे महिना सुरु असल्याने पुन्हा ऊन पडल्यास मुंबईकरांना पुन्हा घामाच्या धारांचा सामना करावा लागेल अशी शक्यता आहे.
मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस होत असला तरी बेस्ट आणि लोकल सेवा सुरळीत सुरु आहे. लोकल सेवा ही फक्त कोव्हिडसाठी तसेच अत्यावश्यक सेवा देणार्यांसाठी सुरु आहे. चक्रीवादळामुळे मान्सूनचाही वेग मंदावला आहे. हवामान खात्याने मुंबई, कोकण किनारपट्टीसह विदर्भाच्या काही भागात पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातही पाऊस होण्याची शक्यता आहे. गुजरातला लागून असलेल्या उत्तर महाराष्ट्राच्या सीमेवर रिमझिम पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai