Breaking News
पनवेल ः इतर राज्यातील मंदिर उघडली असून केवळ महाराष्ट्रातील मंदिरे बंद का? असा सवाल करत राज्यातील मंदिरे उघडे करण्यासाठी भाजपाने राज्यभर शंखनाद आंदोलन केले. सोमवारी पनवेलमध्येही मंदिरे उघडण्यासाठी व झोपी गेलेल्या ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शंखनाद आंदोलन करण्यात आले. आरती करून देवाला साकडे घालण्यात आले.
राज्यातील मंदिरे बर्याच काळापासून बंद आहेत. ही मंदिरे उघडावीत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून 30 ऑगस्ट रोजी राज्यभरात ठिकठिकाणी शंखनाद आंदोलन करत मंदिरे उघडण्याची मागणी केली आहे. लॉकडाऊन शिथील करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारुच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या. हॉटेल, बार, सुरु करण्यात आले आहेत मात्र मंदिर, धार्मिक स्थळांचे टाळे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहरातील विरुपाक्ष मंदिरात शंखनाद आंदोलन करून भक्तीचे दार उघड अशी मागणी केली. यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले कि, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्ण संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत जनजीवन जवळपास पूर्ववत सुरू झाले आहे. ठाकरे सरकारने मांस, मदिरा सर्वकाही सुरू केले परंतु संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ’हरी’ ला मात्र बंदिस्त करून ठेवले आहे. लोकांच्या भावनेचा विचार न करता हम करो सो कायद्याने राज्यातील सरकार कारभार करीत असून सर्वे धार्मिक स्थळे व मंदिरे भाविकांसाठी खुली झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली. ‘मंदिर बंद उघडले बार उद्धवा धुंद तुझे सरकार’, ‘मंदिर बंद गरिबांचे हाल ठाकरे सरकार मालामाल’, ‘भक्तो को जेल मंदिरोपर ताला उद्धव सरकार मे शराब का बोलबाला’, अशा जोरदार घोषणा देऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai