Breaking News
नवी मुंबई : ऐरोलीत काही दिवसांपूर्वी मच्छीमार्केट सुरू करण्यात आले होते. यामासळीबाजारामुळे हजारो मच्छिमार बांधवावर बेकारीची पाळी येणार होती. तसेच वाहतुकीची समस्या देखील आ वासून उभी होती. त्याचबरोबर अवैध मच्छीविक्रेत्यांनी घुसखोरी देखील केली होती. याविरोधात आमदार रमेश पाटील यांनी प्रशासना बरोबर बैठका घेतल्या. त्यानंतर आता मासळी बाजार पुन्हा जुन्या जागेवर स्थलांतरित होणार आहे.
ऐरोली जकात नाका येथे दोन महिन्यांपूर्वी मुंबई येथील कॉफ्रेड मार्केट मधील मच्छीमार्केट स्थलांतरित झाले होते. याअनधिकृत मच्छीमार्केट मुळे नवी मुंबई, ठाणे, भांडुप, नाहूर ,कांजूरमार्ग याठिकाणच्या व परिसरातील सर्व मच्छी विक्रेत्यां कोळी बांधवांवर व भगिनीवर उपासमारी ची वेळ आली होती. याठिकाणी काही घुसखोर लोकांकडून मासे विक्रीचा व्यवसाय सुरू होता. तसेच या मच्छीमार्केट मुळे या ठिकाणी वाहतुकीची समस्या व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते.
हे अवैध मच्छीमार्केट या ठिकाणाहून परत मुंबईला स्थलांतरित करण्याची मागणी मच्छी विक्रेत्या महिलांनी आ. रमेश पाटील यांच्याकडे केली होती. आमदार रमेश पाटील यांनी सदरच्या अनधिकृत मार्केट ऐरोली जकात नाका येथून हलविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे शनिवारी(ता.28) रोजी हे अनधिकृत मच्छी मार्केट परत मुंबईमध्ये हलविण्यात आले आहे.
ऐरोली जकात नाका येथील अनधिकृत मच्छीमार्केट लवकरात लवकर परत मुंबई येथे स्थलांतरित करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या वेळी पोलिस प्रशासनाने हे आंदोलन करू नये असे सांगून या विषयी तोडगा काढण्यासाठी बैठक घेऊन असे सांगितले होते त्यानुसार दिनांक 13ऑगस्ट रोजी परिमंडळ 7 चे पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम व मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये हे मार्केट तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले असून 15 दिवसाच्या आत ते परत मुंबईमध्ये हलविण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार हे मार्केट स्थलांतरीत झाले
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai