Breaking News
नवी मुंबई : एपीएमसी मार्केट परिसरात माथाडी चौकाजवळ 12 सप्टेंबर रोजी गटारीत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पुरुष मृतदेहाचे तुकडे आढळले होते. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. मृतदेहाच्या हातावर रविंद्र नावाच्या टॅटूवरून पोलिसांनी आपली तपास चक्रे फिरवली आणि दोन दिवसातच घणसोली परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेत आणखी किती जणांचा समावेश आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.
घटनास्थळी मिळालेले मानवी अवयव कोणाचे आहेत याची कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. या मृतदेहाच्या हातावरील रविंद्र नावाच्या टॅटूवरुन पोलीसांनी तपास सुरु केला. या गुन्ह्याच्या तपासाकरिता चार विशेष पथके नेमली होती. तपासादरम्यान रवी उर्फ रवींद्र मंडोटिया (वय 30)कोपरी गावात राहत असल्याचे समजले. तीन दिवसांपूर्वी रविंद्र घरी न परतल्याने नातेवाईकांनी कोपरखैरने पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार दोघे एकमेकांना ओळखत होते आणि पैशाच्या वादातून आरोपीने असे कृत्य केले. 9 सप्टेंबरला आरोपींने रविंद्रचा गळा चिरुन खून केला व प्रेताचे तुकडे करुन दोन हात, दोन पाय व मांडी हे एपीएमसी परिसरात व धड महापे परिसरात टाकून पुरावा नष्ट केला. पोलिसांनी घणसोलीमधून सुमित कुमार चव्हाणला (वय27) ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करीत आहेत. अद्याप मृतदेहाचे शीर आणि धड मिळाले नाही. तुकडे केल्याने मृतदेहाची ओळख पटणे अवघड जात असून सुद्धा एपीएमसी पोलिसांनी केवळ दोन दिवसात सुमितला घणसोली येथून ताब्यात घेतले तर शीर आणि धड अजून मिळाले नाही. आरोपीला अटक केल्याने नवी मुंबई पोलिसांचे कौतुक होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai