Breaking News
पुरुषांची संख्या 378 तर महिलांची 124
नवी मुंबई : कोरोनाने जागतिक पातळीवर घातलेल्या थैमानामुळे अनेकांनी आपला रोजगार गमवला असून अनेकांना तणाव, एकटेपणाच्या आजाराचा सामना करावा लागला आहे. अद्याप देखील प्रत्येक व्यक्ती कोरोनाच्या सावटाखाली जगत आहेत. त्यामुळे भविष्यात काय होईल याची चिंता प्रत्येकालाच सतावत आहे. त्यामुळे अनेकांनी नैराष्येतून टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. नवी मुंबई सारख्या शहरी भागात देखील कोरोनामुळे संकटात सापडलेल्या अनेकांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपलवल्याचे उघडकिस आले आहे.
कोरोनामुळे मागील दिड वर्षापासून सर्व सामान्यांचे तसेच हातावर पोट असलेल्या लोकांचे जीवन संकटात सापडले आहे. कोरोनाचा फटका कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाला बसला आहे. त्यामुळे अनेकांनी नैराष्येतून टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबई सारख्या शहरी भागातही मागील दिड वर्षामध्ये आत्महत्येच्या घटनांत वाढ झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या 18 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 532 नागरिकांनी आत्महत्या केल्याचे उघडकिस आले आहे. विशेष म्हणजे यात पुरुषांची संख्या सर्वाधिक 378 इतकी असून महिलांची संख्या 124 इतकी आहे. तसेच या कालावधीत (18 वर्षाखालील) 13 लहान मुले व 17 मुलींनी देखील आत्महत्या केल्याचे उघडकिस आले आहे. त्याचप्रमाणे 2020 या वर्षात 21 व्यक्तींनी तर 2021 या वर्षातील जानेवारी ते जुन या सहा महिन्याच्या कालावधीत सुमारे 15 व्यक्तींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले असून याबाबत विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येच्या घटनांमध्यें कौटुंबिक कारण, आर्थिक असुरक्षितता, शिक्षणाचा तणाव, प्रेमात विश्वासघात आणि व्यसन अशा घटनांचा समावेश आहे.
नवी मुंबईतील आत्महत्येच्या घटनांची आकडेवारी
वर्ष पुरुष स्री मुले मुली एकुण
2020 243 77 5 10 335
2021 135 47 8 7 197
30जुन पर्यंत 378 124 13 17 532
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai