Breaking News
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
मुंबई : गेल्या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क आता त्यांना परत मिळणार आहे. शिक्षण मंडळाने एक परिपत्रक काढून या संदर्भातील माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत सन 2021 मधील इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या मुख्य परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली होती. तसेच उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार मंडळाने सन 2021 मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12वी) चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशत: करण्यात येत आहे. यासाठी माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांचा तपशील 12 नोव्हेंबर सकाळी 11 पासून मंडळाचे 1) इयत्ता 10वी आणि 12वी साठीmahasscboard.in 2) इयत्ता 10वी साठी https://feerefund.mh-ssc.ac.in 3) इयत्ता 12वीसाठी https://feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरुन लिंकद्वारे नोंदविणे आवश्यक आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai