Breaking News
मुंबई : राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने वर्तविला असताना अनेक जिल्ह्यात सकाळपासून पाऊस सुरु झाला आहे. मुंबई, नवी मुंबई, कल्याण, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने हा पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आले आहे.
येत्या 24 तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड अशा विविध ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात कमाल तापमानात घट झाल्याची नोंद करण्यात आहे. नवी मुंबईतही सकाळपासून पाऊस पडत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai