Breaking News
मुंबई : मागील 2 वर्षापासून अनेक संकटांना सामोरे जाऊन महावितरणने कोरोना काळात, नैसर्गिक आपत्ती काळात उत्तम सेवा ग्राहकांना दिली आहे. तरीही ग्राहकांची भांडूप परिमंडलातील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची वीजबिलाची थकबाकी रु. 381.21 कोटींवर पोहोचली असून ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे.
भांडूप परिमंडलातील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांकडे वीज देयकाची नोव्हेंबर-21 अखेर थकबाकी रु. 381.21 कोटी आहे. उच्चदाब ग्राहकांची थकबाकी रु. 35.84 कोटी असून लघुदाब ग्राहकांची थकबाकी घरगुती - 68.21 कोटी , व्यावसायिक - 36.08 कोटी, औद्योगिक- 37.23 कोटी, पाणीपुरवठा योजनांचे - 5.26 कोटी , स्ट्रीट लाईट - 187.4 कोटी, तसेच इतर ग्राहकांची 7.4 कोटी तर कृषीपंप ग्राहकांचे- 3.8 कोटी थकीत आहे. उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची एकूण थकबाकी 381.21 कोटी एवढी आहे. यामध्ये पेण मंडळातील ग्रामपंचायतीची स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठ्याच्या वीजबिलाची थकबाकी शासनामार्फत भरण्याचा निर्णय नुकताच झाला आहे. परंतु, चालू वर्षातील चालू वीज बिलापोटी स्ट्रीट लाईटचे 29.33 कोटी तर पाणीपुरवठा योजनांचे 2.8 कोटी रक्कम थकीत आहे. भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे.
महावितरण सुद्धा एक ग्राहक असून महावितरणला नियमित वीजखरेदीसह दैनंदिन देखभाल व इतर खर्चासाठी मोठी आर्थिक अडचण येत असते म्हणून नाईलाजाने महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करावी लागत आहे. ग्राहकांनी आपले चालू व थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे अन्यथा यापुढे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई अजून तीव्र करण्याचा इशारा भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिला आहे. तसेच, शेजार्याकडून अथवा परस्पर वीजचोरी करणार्या ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai