Breaking News
नवी मुंबई : न्यायालयात वर्षानुवर्षे वाद करीत बसून वेळ, पैसा आणि ताकद खर्च करण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेवून लोक न्यायालयात समेट घडवावा, असा प्रवाह भारतीय न्यायालयाच्या इतिहासात गेल्या दशकात प्रकर्षाने रूढ झालेला आहे. या पार्श्वभूमीवर वाशी न्यायालयात लोक इदालतीचे आयोजन करण्यात आले होते. याम्ये 334 प्रकरणे निकाली लागली असून 46 प्रकरणे दाखल होण्यापुर्वीच तडजोड करुन 4 कोटी 43 लाखांची वसुली संबंधि संस्थेने केली आहे. या लोकअदालतीमध्ये 44 खटल्यांचा ऑनलाईन निकाल देण्यात आला.
दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे खटले मिटवण्यासाठी वेळोवेळी लोक अदालतीचे आयोजन केले जाते. त्यानुसार वाशी न्यायालय व तालुका विधि विभाग यांच्यावीने 11 डिसेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य न्यायाधीश व विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तृप्ती देशमुख-नाईक यांच्या अध्यक्षतेखाली गणेश शिंदे, विनीत शिरसाठी यांनी या लोकअदालतीचे कामकाज पाहिले. त्याकामी नवी मुंबई वकील बार असोसिएशनच्या वकीलांनाही सहकार्य केले. या लोकअदालतीमध्ये एकूम 334 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यापैकी 44 खटल्यांवर ऑनलाईन सुनावणी घेण्यात आली. विविध बँका, महावितरण व इतर संस्थांची 46 प्रकरणे दाखल होण्यापुर्वीच सामंजस्याने निकाली काढून4 कोटी 43 लाख रुपयंाची वसुली करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai