Breaking News
नवी दिल्ली : देशातील मुलींसाठी लग्नाचे कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली आहे. यासाठी सरकार सध्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करणार आहे. संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पहिल्यांदाच याचा उल्लेख केला होता. मुलींना कुपोषणापासून वाचवायचे असेल तर त्यांचे लग्न योग्य वेळी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले होते. सध्या पुरुषांसाठी विवाहाचे किमान वय 21 आणि महिलांचे 18 वर्षे आहे. आता सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करून त्याला एक स्वरूप देणार आहे. स्त्री पुरुष समानतेच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने हे पाऊल उचलेले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai