Breaking News
नवी मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषदेचे महा कवि संमेलन रविवारी वाशीतील योग विद्या निकेतन केंद्रात संपन्न झाले. यावेळी या कवी संमेलनामध्ये पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ कवि अरुण म्हात्रे, प्रा. प्रदिप ढवळ, नाट्य अभिनेते विलास गुर्जर, डॉ. अशोक पाटील, जयेंद्र खुणे, घनश्याम मढवी आदी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित कविंनी आपापल्या कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी श्रीहरी पवळे यांच्या बहुरंगीमन या चारोळ्या संग्रहाचे प्रकाशन देखील मान्यवरांचे हस्ते झाले.
यावेळी नव कविंना मार्गदर्शन करताना कोकण मराठी साहित्य परिषदेचा विस्तार वाढविण्याच्या दृष्टीने कार्यकारणीमध्ये नवीन चेहर्यांना संधी देवून को.म.सा.चे शिवधनुष्य पेलण्यासाठी आता नव कवि, साहित्यिक यांनी पुढे यावे असे आवाहन ज्येष्ठ कवि अरुण म्हात्रे यांनी केले. यावेळी त्यांनी कविता सादरकीरणातून नवकवींची मने जिंकली. जिल्हा अध्यक्ष मोहन भोईर यांनी पुढील काळात सर्वांना घेवून चांगले, दर्जेदार कार्यक्रम करण्यासाठी कविंचे, साहित्यिकांचे संमेलन, चर्चासत्रे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला. त्याचबरोबर जिल्हा संपर्कप्रमुख पदी श्रीहरी पवळे यांची नियुक्तीची घोषणा केली.
या संमेलनात अनेक नव कवींनी कवीता सादर केल्या. यात जितेंद्र लाड, शंकर शेडगे, श्याम माळी या नव कवींचा समावेश होता. या कार्यक्रमप्रसंगी श्रीहरी पवळे यांनी काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधत होती. शिवाय मधु मंगेश कर्णिक यांनी सदर रांगोळीचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दमयंती भोईर तर आभार मोहन भोईर यांनी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai