Breaking News
मुंबई : बृहन्मुंबईतील 41 कोळीवाड्यांपैकी 31 कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण झाले असून 4 कोळीवाड्यांचे सीमांकन प्रगतीपथावर आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध असल्याने सीमांकन होऊ शकले नाही. तथापि, विरोध कमी झाल्यास त्याही ठिकाणी सीमांकन करण्यात येईल तसेच कोकणपट्टीच्या सर्वंच कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत विधानपरिषद सदस्य रमेशदादा पाटील, अॅड निरंजन डावखरे, प्रसाद लाड, प्रविण दरेकर, भाई गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai