Breaking News
मुंबई : 17 जिल्ह्यात 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला.
92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतींसाठी 18 ऑगस्टला मतदान तर 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. 22 ते 28 जुलैपर्यंत आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी आणि वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहिर होणार असून 4 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलडाणा यांचा समावेश आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai