Breaking News
मुंबई ः चार प्रभागाबाबत राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दणका बसला आहे. शिंदे सरकारने मविआ सरकारचा निर्णय रद्द करून पुन्हा 2017 च्या म्हणजेच 4 च्या प्रभागानुसार निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.
महाविकास आघाडीने सरकारने महापालिकांमध्ये प्रभागानुसार निर्णय घेतला होता. पण शिंदे सरकारने तो निर्णय रद्द ठरवला होता आणि 4 प्रभागाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर आज सुनावणी होऊन सुप्रीम कोर्टाने स्टेट्स कोचा आदेश दिला आहे. यामध्ये मुंबईसह सह सर्व महत्वाच्या शहरातील महापालिका, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी हा निर्णय लागू होणार आहे असे सांगितले. या निर्णयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिंदे सरकारने मविआ सरकारचा निर्णय रद्द करून पुन्हा 2017 च्या म्हणजेच 4 च्या प्रभागानुसार निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai