Breaking News
गोल्डक्रेस्ट हायस्कुलचा पुढाकार ; दोन दिवसीय उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद
नवी मुंबई ः गोल्डक्रेस्ट हायस्कुल वाशी येथे विद्यार्थ्यांच्या सहभागाने 21 ऑरगॅनिकच्या संयुक्त विद्यमाने फेअरट्रेड उपक्रमाबद्दल स्थानिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 3 व 4 डिसेंबर रोजी सेंद्रिय शेतकरी बाजाराचे आयोजन केले होते. याला शेतकर्यांचा व स्थानिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. दर शुक्रवारी याच ठिकाणी ऑरगॅनिक फार्मर्स मार्केटचे आयोजन केले जाणार आहे.
शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळवून देणे तसेच स्थानिकांना सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली फळे, ताजी व आरोग्यदायी भाजीपाला मिळणे आणि स्थानिक व्यापार्यांना या व्यापारासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ऑरगॅनिक फार्मर्स मार्केटचे उद्घाटन सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार राजन विचारे ह्यांनी भूषविले. सर्व मान्यवरांचे स्वागत मांजरा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव अमित विलासराव देशमुख आणि गोल्डक्रेस्ट ग्रुप ऑफ स्कूलच्या प्रमुख आदिती देशमुख यांनी केले. असे उपक्रम शेतकर्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सिडकोचे एमडी व पालिका आयुक्त यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होईल असा हा उपक्रम नवी मुंबई क्षेत्रातही राबविण्याचा मानस व्यक्त केला. मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट आणि गोल्डस्ट हायस्कुल, वाशी अशा प्रकारच्या संधी निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतील जेणेकरून शेतकरी आणि ग्राहक थेट जोडले जाऊन एकमेकांना पूरक वातावरण तयार होईल आणि चांगला व्यापार होईल. शेतकर्याला त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळू शकेल. ऑरगॅनिक फार्मर्स मार्केटच्या माध्यमातून स्थानिक समुदायांमध्ये सेंद्रिय शेतीबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच चांगल्या व्यापाराला चालना देणे, हे उद्दिष्ट आहे असे मांजरा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले. तसेच गोल्डक्रेस्ट हाय, वाशी येथे दर शुक्रवारी ऑरगॅनिक फार्मर्स मार्केटचे आयोजन केले जाईल असेही त्यांनी सांगितले.
संचालक-प्राचार्य कविता मल्होत्रा म्हणाल्या, फेअरट्रेड या उपक्रमाद्वारे नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी 21व्या शतकातील कौशल्यांवर भर देण्यात आला आहे. मुलांना जागरूक शेतीच्या पद्धतींबद्दल जागरूक करणे गरजेचे आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना निसर्गाच्या जवळ आणणारे सह-अभ्यासक्रम शिकवले जातात. शेतकरी हे सर्वोत्कृष्ट पर्यावरणवादी आहेत म्हणून त्यांच्याबद्दल आदराची भावना जागृत करणे अत्यावश्यक आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai