Breaking News
आठवड्यातून तीन दिवस पाणी कपात
उरण ः उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाल्याने उरणकरांना आता पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. रानसई धरणात 4.655 चउच् एवढाच पिण्याचा पाणीसाठा उपलब्ध आहे. शिवाय या वर्षी दिघोडे बार्टर व्यवस्थेतून पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तर्फे उरण नगर परिषद हद्दीत व उरण तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींना1 जानेवारीपासून मंगळवार, शुक्रवार व रविवार असे आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
उरण मध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच आहे, दररोज नवनविन औद्योगिक प्रकल्प येत आहेत. विविध विकास कामे, द्रोणागिरी नोड सारखे नव्याने वसलेले अत्याधुनिक वसाहत, जे एन पी.ए (जेएनपीटी)सारखे आंतरराष्ट्रीय बंदर यामूळे पाणी पुरवण्याची मागणी अधिक वाढली आहे. यामूळे पाणी पुरवठ्याची तूट वाढत आहे. याकरीता आठवड्यातून तीन दिवस नगरपरिषद व उरण तालुक्यातील 20 ग्रामपंचयतींना पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. जोपर्यंत पावसाळा सुरू होत नाही तोपर्यंत आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.हा पाणीपुरवठा जून महिन्या पर्यंत बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे. पाण्याचे योग्य ते नियोजन करून पाणी वापरावे. पाणी वाया घालवू नये असे आवाहन उपअभियंता रविंद्र चौधरी यांनी नागरिकांना केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai