Breaking News
मुंबई ः कोरोनाचे संकट दूर गेल्यानंतर राज्यासह देशाचा आर्थिक गाडा पुन्हा सुरू झाला. कोरोनाकाळात अर्थव्यवस्थेचे चाक टाळेबंदीत रुतल्याने सरकारसमोर महसुलाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता, कोरोनानंतर आर्थिक गाडा पूर्वपदावर आल्याने चालू आर्थिक वर्षामध्ये मद्याच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मद्य विक्रीतून सरकारच्या तिजोरीत भर पडली आहे. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात मद्य विक्रीतून मिळणार्या महसुलात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातल्या नऊ महिन्यांमध्ये 14 हजार 480 कोटींचा महसूल मिळाला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai