Breaking News
7 लाख 60 हजारांच्या 10 रिक्षा जप्त
नवी मुंबई ः नवी मुंबई गुन्हे शाखेने रिक्षा चोरी करून विक्री करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 7 लाख 60 हजार रुपयांच्या 10 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. याच टोळीतील काही साथीदारांचा शोध सुरु आहे.
नवी मुंबईत रिक्षा चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे आयुक्त मिलिंद भांबरे यांनी यावर विशेष गुन्हे पद्धतीवर अभ्यास करीत तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजयसिंह भोसले यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची नेमणूक केली. या पथकाने मोटार वाहन चोरी करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करून त्यावेंवर प्रतिबंधक कारवाई सुरु केली. त्यात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडणाऱ्या वाहन चोरीबाबत खबरीने माहिती दिली. त्यानुसार चित्ता कॅम्प मानखुर्द येथे राहणारा आरोपी रेहमान युसुफ खान हा हसन इमाम साहब सय्यद याच्या कडून रिक्शा घेणार असल्याची माहिती मिळाली. ही रिक्षा चोरीची असल्याचेही समोर आल्याने आरोपी ज्या ठिकाणी भेटणार त्या ठिकाणी सापळा लाऊन ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, त्यांनी व त्याचे साथीदार रसुल अकरम खान, मोहम्मद नदीम नईम शेख, शहाबाज उर्फ बाटली शकिल हुशिले यांनी नवी मुंबई, मुंबई, ठाणे परीसरातून ऑटो रिक्षा चोरी केल्याची माहिती दिली. त्यामुळे रेहमान युसुफ खान, हसन इमाम साहब सय्यद , मोहम्मद नदीम नईम शेख , शहाबाज उर्फ बाटली शकिल हुशिले यांना अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्हयातील रसुल अकरम खान, नईम जलेला, यांचा शोध चालु आहे.अशी माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. आरोपींनी चोरी केलेल्या व त्यातील काही इतरांची फसवणूक करून विकलेल्या 7 लाख 60 हजार रुपयांच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. यात वाढ होण्याची शक्यता आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai