Breaking News
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा एकूण पाच मतदारसंघात 30 जानेवारी रोजी शांततेत मतदान झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
नाशिक, अमरावती पदवीधर; तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात 49.28 टक्के, अमरावती विभागात 49.67 टक्के, औरंगाबाद विभागात 86 टक्के, नागपूर विभागात 86.23 टक्के आणि कोकण विभागात 91.02 टक्के असे इतके विक्रमी मतदान झाले. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार गुरुवारी (ता. 2) मतमोजणी होणार आहे.
कोकण शिक्षक मतदार संघासाठी पनवेल तालुक्यात एकूण 4265 मतदार आहेत. यापैकी 1221 पुरुष व 2654 महिला मतदार एकूण 3875 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये महिला मतदारांची संख्या सर्वाधिक पाहायला मिळाली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai