Breaking News
नवीन पनवेल ः सिडकोच्या बहुचर्चित नैनाविरोधात 12 फेब्रुवारीपासून पनवेल परिसरात गाव बंद साखळी आंदोलन केले जात आहे. माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनात सुकापूर, आदई, विहीघर, बोनशेत, पळस्पा गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे ‘नैना'विरोधात गावपातळीवर ग्रामस्थांमध्ये असंतोषाची लाट पसरल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई एअरपोर्ट नोटिफाईड एरिया अर्थात नैना प्रकल्पाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांनी आरपारच्या लढाईचे हत्यार उपसले आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई, पनवेल, उरणमधील 270 पेक्षा अधिक गावे विमानतळबाधित म्हणून अधोरेखित करण्यात आली आहेत. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्या ठिकाणी नियोजित शहर वसवण्यासाठी सिडको प्रयत्नात आहे; पण शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने घेऊन मलिदा लाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप प्रकल्पबांधितांकडून केला जात आहे. नैना क्षेत्रातील 23 गावांनी या प्रकल्पाविरोधात तीव्र संघर्षाची तयारी केली आहे. याच अनुषंगाने शेकापचे माजी आ.बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात गावबंद साखळी आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनात नैना प्रकल्पबाधित उत्कर्ष समितीच्या वतीने ॲड. सुरेश ठाकूर, अध्यक्ष वामन शेळके, सचिव राजेश केणी, शेखर शेळके, नामदेव फडके, सुभाष भोपी, अनिल ढवळे यांच्यासह 23 गावांतील शेतकरी, नागरिक सहभागी आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai