Breaking News
वेळेत वीज बीले देण्याची खोपटे ग्रामस्थांची मागणी
उरण ः खोपटे गावात उशिरा मिळणाऱ्या वीज बीलाच्या घटनेवरून महावितरणाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. वीजेची बील भरायची तारीख संपल्या नंतर वीजेचे बील मिळत असल्याने ग्रामस्थांना उशिरा वीज बिल मिळत असल्याने अधिक पैसे देऊन दंड भरावा लागत आहे. त्यामुळे जर वेळेत वीज बील मिळाले नाही तर यानंतर वीजेचे बील भरणार नाही. विजेचे कनेक्शन बंद करायला आले तर ते सुद्धा करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका खोपटे ग्रामस्थांनी घेतली आहे.
महावितरणाच्या नियमानुसार प्रत्येक महिन्यात ग्राहकांना वेळेत वीज बिल देणे बंधनकारक आहे. देयक दिनांक संपण्याच्या अगोदर वीज बिल ग्राहकांच्या हातात देणे बंधनकारक असताना खोपटे ग्रामस्थांना देयक दिनांकच्यानंतर वीज बिले मिळत असल्याने तारखेनंतर पैसे भरल्यास वीजेच्या बीलाचे पैसे व दंडाचे पैसे एकत्रित भरावे लागतात. वारंवार होणाऱ्या या महावितरणाच्या कारभाराला खोपटे ग्रामस्थ वैतागले असून जर वेळेत वीज बील मिळाले नाही तर यानंतर वीजेचे बील भरणार नाही. तसेच बील भरले नाही म्हणून जर कोणी महावितरणचे अधिकारी कर्मचारी वीज कट करायला आले, विजेचे कनेक्शन बंद करायला आले तर ते सुद्धा करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका खोपटे ग्रामस्थांनी घेतली आहे.त्या अनुषंगाने काही ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय सोनवले व नायब तहसीलदार नरेश पेढवी यांची भेट घेतली. वीजेचे बील वेळेत मिळावे, तारीख संपण्याच्या किमान 10 दिवस अगोदर ग्रामस्थांना वीज बील मिळावी अशी मागणी ग्रामस्थ मंडळ खोपटेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण वीज कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय सोनवले यांच्याकडे पत्रव्यवहार करून केली आहे. निवेदन देऊन वीजेच्या विविध समस्या त्वरित सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नायब तहसिल नरेश पेढवी यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले. या नंतर वीजेचे बीले वेळेत सर्वांना मिळतील असे आश्वासन विजय सोनवले (अतिरिक कार्यकारी अभियंता महावितरण उरण)यांनी खोपटे ग्रामस्थांना दिले. खोपटे गावातील समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊ असे नायब तहसीलदार नरेश पेढवी यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai