Breaking News
नवी मुंबई : सतत बदलणाऱ्या वातावरणाचा फटका डाळींच्या उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे बाजारात डाळींची आवक कमी होत असून दरात वाढ होत आहे. पुढील कालावधीत ही डाळींचे दर चढेच राहतील असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार समितीत यंदा अवकाळी पाऊस आणि उष्ण वातावरणाने कडधान्य उत्पादनात घट झाली असून आवक कमी होत असल्याने दरात वाढ झाली असल्याचे मत घाऊक व्यापरी करीत आहेत. घाऊक बाजारात तूरडाळ, मुगडाळ, चणाडाळ यांच्या दरात 2 ते 3 टक्के वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून डाळी दाखल होतात, परंतु राज्यातून आणि गुजरात मधून मोठ्या प्रमाणावर डाळींची आवक होते.मात्र पावसामुळे उत्पादनाला फटका बसला असून बाजारात डाळींची आवक कमी होत आहे. मंगळवारी घाऊक बाजारात 656 क्विंटल चणाडाळ आवक असून आधी प्रतिकिलो 57 रुपयांनी उपलब्ध होती ती आता 61 रुपयांवर गेली आहे. मुगडाळ 1549 क्विंटल तर तूरडाळ 1648 क्विंटल दाखल झाली असून प्रतिकिलो 94 रुपये असणाऱ्या या डाळीने आता शंभरी गाठली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai