Breaking News
नवी मुंबई : किल्ले रायगडावर 2 जून रोजी तिथीप्रमाणे होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून 1101 ठिकाणाहून आणलेल्या पवित्र जलाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करण्यात येणार आहे. हे जमा केलेले पवित्र जल घेऊन जाणाऱ्या रथाचे 27 मे रोजी दुपारी वाशीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
दुर्गराज रायगडावर तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातील 1101 पवित्र ठिकाणाहून जल गोळा करून ते एका रथातून रायगडाकडे रवाना करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल बैस व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या पवित्र जलाचे पूजन करून मुंबईहून रायगडाकडे रवाना करण्यात आलेल्या या रथाचे विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शनिवारी दुपारी या रथाचे आगमन झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते या कलशाचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, तसेच भाजपचे अनंत सुतार, दशरथ भगत, विजय वाळुंज, अजय वाळुंज, सुरेश तुकाराम शिंदे उपस्थित होते. या सोहळ्याला भाजपाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमीही मोठया संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai