Breaking News
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आशियातील सर्वात मोठी एपीएमसी बाजारपेठ असणार्या वाशीतील एपीएमसी मार्केट आठवड्यातील दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एपीएमसी मधील गर्दी कमी करण्यासाठी आणि रोग प्रतिबंधक उपाय करण्यासाठी गुरूवार आणि रविवार या दोन दिवशी एपीएमसी बंद करून स्वच्छ करण्यात येणार आहे. मार्केटच्या गेटवर सॅनिटायजरच्या बॉटल ठेवण्यात येणार असून येणार्या प्रत्येकाला मास्क किंवा रूमाल लावणे अनिवार्य करण्यात आले आह
सध्या कोरोनोची धास्ती सगळ्यांनाच लागली आहे. एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये रोज तब्बल 50 हजार लोकांची होणारी आवक जावक 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी व्यापारी प्रयत्न करत आहेत. यासाठी होलसेल व्यापार्यांनी ग्राहकांना एपीएमसीमध्ये न येता फोनवर ऑर्डर द्यावी अशी विनंती केली आहे. मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या भागातून हजारोच्या संख्येने किरकोळ व्यापारी एपीएमसी मार्केटमध्ये शेतीमाल खरेदी करण्यासाठी येत असतात. मात्र आता त्यांना मार्केटमध्ये न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. व्यापारी आपल्या टेम्पोने ग्राहकांपर्यंत त्यांचा माल पोहचविणार आहेत. एपीएमसीमधील आवक जावक कमी करण्यासाठी व्यापार्यांनी हा घेतला निर्णय.
शीघ्र नाशवंत माल असल्याने एपीएमसी मार्केट बंद ठेवणे शक्य नाही. बंद केल्यास शेतकरी वर्गाचे लाखोंचे नुकसान होवू शकते तर दुसरीकडे शहरातील ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू मिळणे दुरापास्त होण्याची शक्यता असल्याने एपीएमसी बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai