Breaking News
रेल्वे स्थानकांवर गावाला जाणार्यांची प्रचंड गर्दी
मुंबई : वाढत जाणार्या कोरोना व्हायरसची धास्ती सर्वांच्या मनात आली आहे. राज्य सरकारने मोठी खबरदारी घेतली आहे. कोणीही गर्दी करु नये, आवश्यक असेल तर प्रवास करावा अन्यथा करु नये, असे सक्त आदेश दिले आहेत. असे असताना कोरोनाच्या भितीने अनेक जण गावाला जाण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र मुंबई, पनवेल आणि पुणे येथील रेल्वे स्थानकांवर दिसून आले. रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
करोनाच्या दहशतीमुळे पुणे, मुंबई सोडून जाणारे लोक स्टेशनवर आज सकाळपासून गर्दी करत आहेत. सध्याच्या परिस्थितीत प्रवास टाळण्याचे आवाहन सरकारने केले आहे. तरी रेल्वे स्थानकावर गर्दी आहे. बहुतेक ठिकाणी काम बंद असल्याने तसेच कोरोनाच्या भीतीने पुणे मुंबईतील लोक आपापल्या गावी जात आहेत. कोरोनामुळे राज्यातील महानगरांमधील ऑफिसेस बंद आहेत, बाजारपेठा बंद आहेत. त्यात कोरोनाची दहशत आहे. त्यामुळं सामान्य कष्टकरी माणसानं गावाकडे धाव घेतली आहे.
मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस ,पनवेल आणि पुणे स्टेशनवर गावाकडं निघालेल्या प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेनं मुंबईतून बाहेरगावी जाणार्या अनेक एक्स्प्रेस रद्द केल्यात. त्यामुळे अनेक प्रवासी स्टेशनवर येऊन थांबत आहेत. किंवा पर्यायी गाडी पकडून गावाकडं जाताना दिसतायत. रेल्वेनं या प्रवाशांच्या प्रवासाचं नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा या गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. दरम्यान, संपूर्ण जगाचा कोरोनाविरुद्ध लढा सुरू आहे. या लढ्यात महाराष्ट्राला पहिला विजय मिळताना दिसतोय. महाराष्ट्रातला कोरोनाचे पाच रुग्ण बरे झालेत. आणि इतर रुग्णांची तब्येतही झपाट्यानं सुधारत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai