Breaking News
नवी मुंबई ः स्वच्छता आणि पर्यावरण या दोन महत्वाच्या घटकांकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष दिले जात असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागावर भर देत नानाविध उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत अभियानाच्या नोडल अधिकारी तथा अतिरिक्त् आयुक्त सुजाता ढोले व घनकचरा विभागाचे उप आयुक्त् डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली ऐरोली खाडीकिनारी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी यांच्यासह निर्धार फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी उत्स्फुर्त सहभाग घेत ऐरोली खाडी किनारा परिसरातील खारफुटीमध्ये अडकलेला कचरा व त्यातही विशेषत्त्वाने प्लास्टिकचा कचरा व प्लास्टिक बाटल्यांचा कचरा जमा केला. अशाप्रकारे विविध स्वयंसेवी संस्थामधील जागरुक सदस्य मोठया प्रमाणात अशा मोहिमांमध्ये सहभागी होत असल्यामुळे नवी मुंबईतील पर्यावरण संरक्षणाला गती लाभत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai