Breaking News
नवी मुंबई ः पावसाळा सुरु झाला की खारघर शहराच्या कुशीतून धो धो वाहणारा पांडवकडा मुंबईसह उपनगरातील पर्यटकांना खुणावू लागतो. मात्र येथे घडणाऱ्या अपघातांमुळे पर्यटकांना बंदी घातली जाते. यंदाही या धबधब्यावर सुरक्षेच्या कारणावरून वन खात्याने बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.
खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर दरवर्षी हजारो पर्यटक येतात. मात्र अतिउत्साहाच्या भरात किंवा हलगर्जीपणामुळे अनेक वेळा याठिकाणी अपघात घडले आहेत आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळेच वनखात्याने याठिकाणी पर्यटकांना येण्यास मज्जाव केला आहे. यंदाही पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
पांडवकडा धबधब्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. वनविभागाने पर्यटकांसाठी प्रवेश बंद केल्यानेच याठिकाणच्या पर्यटन क्षेत्राला चालना कशी मिळणार असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. पर्यटकांच्या जीव धोक्यात जाऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे. पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन करू नये. याठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांना देखील पत्र लिहणार असल्याची माहिती वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी देविदास सोनावणे यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai