Breaking News
केंद्राची नागरिकांसाठी जाहीर सूचना
नवी मुंबई ः केंद्र सरकारने वीज ग्राहकांसाठी कायद्यामध्ये बदल केला असून त्याबाबत मार्गदर्शक करणारी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. वीज पुरवठा कंपनीच्या गचाळ कारभाराचा फटका ग्राहकांना बसू नये म्हणून नागरिकांना आता वीज पुरवठा कंपनीविरुद्ध नुकसान भरपाई मागण्याचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे वीज पुरवठा कंपनीच्या सेवेत अत्यावश्यक सुधारणा होतील अशी सरकारची भुमिका या बदलामागील आहे.
केंद्र सरकारने विद्युत कायदा 2003 च्या नियम 176(2) मध्ये सूधारणा केली असून त्यामध्ये वीज ग्राहकांना वीज पुरवठा कंपनीच्या अपुऱ्या व नियमीत सेवा न देण्याच्या कार्यशैलीला आता ग्राहक संरक्षण कक्षेत आणले आहे. या सूधारणे अंतर्गत वीज पुरवठा कंपनीला ग्राहकांना 24द7 वीजपुरवठा करणे बंधनकारक केले असून अनावश्यक कारणाने सतत लोडशेडिंग करता येणार नसल्याचे नमुद केले आहे. यामध्ये फक्त कमी वेळ वीज पुरवठा देण्यासाठी शेती क्षेत्राची निवड केली आहे. कायद्याने नवीन जोडणी देणे, जोडणी खंडीत करणे व पुर्नजोडणी करणे, ग्राहकांच्या संवर्गात बदल करणे, वेळेवर देयके देणे, बिलाची संबंधित तक्रारी तसेच विजेच्या दाबात कमी-जास्त फरक होणे यातील दोष दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ठराविक वेळ वीज वितरीत कंपनीला घालून दिला आहे. यामध्ये दिरंगाई झाल्यास वीज ग्राहक आता वीज कंपनीविरुद्ध नुकसान भरपाईस पात्र ठरणार आहे.
नवीन नियमानुसार पुरवठादार कंपनीच्या यादीवरील कंपनीचे मीटर नागरिक स्वतः बसवू शकतात. वीज कंपनीला स्मार्ट मीटर बसवायचे असल्यास त्याबाबतची आगाऊ सूचना तसेच ग्राहकांचे प्रबोधन करणे बंधनकारक आहे. प्री-पेड मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना त्यांचा दररोजचा वीज वापर ऑनलाईन पद्धतीने पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे पुरवठादार कंपनीला बंधनकार आहे. या नियमाच्या अंतर्गत वीज पुरवठा कंपनीला स्वतःचे संकेतस्थळ विकसीत करायचे असून त्यावर ग्राहकांना तक्रार नोंदवण्याची सोय उपलब्ध करुन देणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर 24द7 टोल फ्री नंबरद्वारे तक्रार नोंदवून घेणे व याची माहिती ग्राहकांना देणे विज कंपनीला गरजेचे आहे. सदर कंपनीला ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी ग्राहक निवारण मंच निरनिराळ्या स्तरावर स्थापना करायचा आहे व त्यावर योग्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय या मंचावर अनुभवी आणि शिक्षित व्यक्तींची नेमणुक करणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारने बदलेल्या या नियमांचे वीज ग्राहक मंचाने तसेच नागरिकांनी स्वागत केले असून याबाबतच्या सूचना लवकरात लवकर अमंलात आणण्याची मागणी होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai