Breaking News
5 कोटी 690 लाखांचा दंड वसूल
नवी मुंबई : कोकण रेल्वेच्या विविध मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात कोकण रेल्वेने धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत मागील तीन महिन्यात 18,466 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून 5 कोटी 690 लाख 99 हजार 17 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोकण रेल्वेच्या विविध मार्गावरील गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने प्रत्येक गाड्यांतून नियमित तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. या पथकाने डिसेंबर महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 6675 प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून 1 कोटी 95 लाख 64 हजार 926 रुपयांचा दंड वसूल केला होता, तर ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात तपासणी मोहिमेत 18,466 प्रवासी विनातिकीट आढळून आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करून 5 कोटी 60 लाख 99 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, प्रत्येक मार्गावरील गाड्यांतून ही तपासणी मोहीम सुरूच राहणार असून, गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai