Breaking News
उरण : करंजा ते रेवस या पारंपरिक जलमार्गाने बोटीत दुचाकी घेऊन शंभर रुपयात प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे उरण ते अलिबाग दरम्यानच्या 40 किलोमीटर रस्ते प्रवासातील खड्ड्यांपासून दिलासा मिळत असून वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होत आहे.
उरणच्या करंजा ते अलिबाग तालुक्यातील रेवस या जलमार्गाने शेकडो वर्षांपासून प्रवास सुरू आहे. ही जलसेवा बारमाही सुरू असते. मात्र पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने हवामानातील वातावरणानुसार ही सेवा बंद करण्यात येते. तर यावेळी या प्रवासी बोटीतून ये जा करणाऱ्या दुचाकी वाहनांना बंदी घालण्यात येते. 1 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा या बोटीतून दुचाकी वाहने ने आण सुरू करण्यात आली आहे. या मार्गावरील एकेरी प्रवासासाठी 20 रुपये तिकीट दर आहे, तर दुचाकी वाहनांसाठी 80 रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे 100 रुपयांत हा प्रवास करता येतो. यामध्ये अलिबागवरून मुरुड तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळ पाहण्यासाठीही याच मार्गाने ये जा करण्याला मुंबई व नवी मुंबईतील प्रवासी प्राधान्य देत आहेत. या मार्गाने अर्धा ते पाऊण तासात अलिबागला जाता येते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai