Breaking News
पनवेल : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असला तरी जिवाची पर्वा न करता पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. नवी मुंबई पोलीस दलातील 950 जणांना आतापर्यंत करोनाचा संसर्ग झाला आहे तर 9 जणांचा बळी गेला आहे.
नवी मुंबई पोलीस दलातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणारे शांतिलाल कोळी यांचा रविवारी डी. वाय. पाटील रुग्णालयात करोना उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कोळी हे 55 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. कोळी हे सीबीडी बेलापूर येथील पोलीस वसाहतीमध्ये राहत होते. सध्या ते एनआरआय पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 15 सप्टेंबरपासून त्यांना करोनाची लक्षण दिसू लागल्याने डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai